मैत्री हक्काची असते तेव्हा आपण किती मनमोकळेपणाने बोलतो ना. अगदी सर्वच. बिनधास्त, पुढे काय होणार याचा जराही विचार करत नाही. खळखळत्या पाण्यासारखी पुढे-पुढे-पुढे सरकत जाते ती मैत्री. काही गोष्टी पटतात काही नाही. पण शांत समंजस्याने राहून बघाव राहता येत. प्रत्येकचवेळी शांत राहिल्यावर एकदा कधीतरी बान सुटतोच नाही का ? पण तेव्हा खरी गरज ही मैत्री ओळखण्याची असते. प्रत्येकवेळी शांत राहणारी, शांत समजस्यांनी वागणारी राहणारी जर एखादेवेळी अचानक चिडली तर अशावेळी काय प्रतिक्रिया असावी ? क्षणभर राग साहजिकच आहे. पण......पण अंतर्मनात खोलात जाऊन विचार केला. मुळाशी गेलो तर उत्तर नक्की सापडत. अशावेळी अबोला धरणे खरच योग्य आहे का ? आपण जेव्हा आपल्या माणसांवर कळत नकळतपणे रागावतो ,भांडतो,माफी मागतो पुन्हा जवळ येतो. ज्या व्यक्तीवर आपण हक्क दाखवतो ती व्यक्ती आपल्याला आपल्या जिवापेक्षाही प्रिय असते. ...
निस्वार्थीपणे जगत आले आहे पण इतरांनी अर्थ मात्र सोईनुसार लावले खोटे वागणे कधी नाही जमले खोटे खोटे चांगले म्हणावे तरी कसे स्वतःच्या आनंदासाठी कुणालाही कधीच फसवले नाही अन ते कधी जमनारही नाही चुकांवर पांघरून कधी देता आले नाही इतरांना दुःखून आनंदी कधीच झाले नाही स्वतःचा खरेपणा इतरांच्या वागण्याला टीचवत गेला खरेपणातूनच शहाणपणा असा शिक्का मिळाला या सर्वांमुळे जर कुणी म्हणत असेल मला की मला माणस जपता येत नाही तर याचा सार्थ अभिमान आहे माला. नम्रता मंदा अनंत