मुख्य सामग्रीवर वगळा

असा एक क्षण येतो......

 


       किती वेगळ आहे ,जे आवडत,बघितलेलं असत , त्याचा विचारही होत नाही आणि ज्याला कधी पाहिलेलं नसत,काही  माहिती नसत कुणीतरी तिसरी व्यक्ती येऊन सांगते त्यावर विश्वासही बसतो. त्यांच्या सांगण्यावरून वारंवार दाखवायलाही आपले  नातेवाईक, घरचे  तयार होतात.

        आपण आयुष्यात कितीही चांगल वागलं ना तरीही काही ना काही राहूनच जात. आपलं वागणं, बोलण, प्रत्येकवेळी सारख असेलच अस नाही ना.
     आपली होणारी चिडचिड ही रास्त असते. पण ती समजून घेता आलं असत तर किती बर झालं असत . अस म्हणतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही कायम हसत रहायच. आपले गराने कुणालाही सांगायचे नाही.कमाल आहे ना ,प्रत्येकवेळी नाही हो पुस्तकातल्या शब्दसारखं जगता येत.
       वाटत कुणाजवळ तरी बोलावं ,हक्काचे. प्रत्येकच बाब सांगावी

. नेहमीच चांगल्या गोष्टी का शेअर कराव्यातना कधी कधी मनातली प्रत्येकच गोष्ट बोलावी. मी म्हणते बोलावीच याने मन हलक होत की नाही माहीत नाही पण यामुळे नवीन चांगल्या गोष्टींचा विचार मन करायला लागत.

      बोलाव सर्वकाही मनसोक्त अगदी सर्वच. चिडचिड करावी आदळ आपट करावी हे सर्व होणे गरजेचे आहे.हे जर नाही केल ना तर एक वेगळीच  घुसमट होते.जे की हानीकारक आहे.स्वतःसाठी सोबतच इतरांसाठीही. हल्ली याला मूड स्विंग असे लेबल लावण्यात आल आहे.
       का जगतोय आपण पुतळ्यासारख. जितकं सोज्वळ, शांत, समजदार दाखवतो तितकं खरच आहोत का हो? समजदारीच्या गोष्टी ज्या जगासमोर दाखवतो ते घरातही पाळतो का?खरं सांगा?
        कधी कधी ना उगाच चिडचिड होते पण ते समजून घेता आल असत ना तर किती भारी झालं असत.कधी कधी उगाचच वाटत मनसोक्त बोलाव. पण हल्ली just ignore अस चाल्लय.उगाचच व्यस्त दाखवायच ट्रेंड आहे ना. जे खरोखर व्यस्त असतात त्यांचा विषय वेगळा हा. कस आहे ना बोलाव,जे असेल ते स्पष्ट. गुंता कमी होतो हो.
          आयुष्यात प्रत्येकालाच काम आहे ,प्रत्येकच जण आपापल्या कामात व्यस्त आहे.अगदी कुत्रे मांजरीसुद्धा हल्ली व्यस्त झालेत. पण खर सांगू आज परिस्थिती अशी आहे ना कधी कुणाची विकेट पडेल सांगता येत नाही.
             बघा वेळ मिळत असेल तर.......नुसताच विचार करून उपयोग नाही.कस आहे ना आयुष्यातला एक क्षण असा येतो खूप एकट वाटत. बरोबर ना?प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो. याला अनेकांची उत्तरे येतात पॉझिटिव्ह वे ने जगायचं ग,सर्व नीट होत.पॉझिटिव्हच्या नावाखाली प्रयत्न करणे आपण सोडून देतो ,हो ना?

नम्रता अनंत कडव

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपुर्ण

                                                          असाही एक दिवस उगवेल असं कधी वाटलंच  नाही, मी माझं माझं करत राहिली अन माझं कधी निसटून गेलं समजलंच नाही...     अचानक मला काल रात्री कॉल आला आणि तो म्हणाला मला कोणत्याही परिस्थितीत मध्ये दोन महिन्याच्या आत लग्न करायचंय.! मला समजेच ना की, हा अचानक असा का बोलतोय..? मला वाटलं नेहमीसरखी आजही प्रेमाने चेष्टा करत असेल. मी दुर्लक्ष करत विषय सोडून दिला.   आज पहिला पेपर असल्याने सकाळी उठून, पटापट आवरून पेपरला गेले, पेपर सुटल्यावर मोबाइल बघितला तर त्याचे 6 मिस कॉल होते , मी घाबरले कि असं काय झाल कि एकदम 6- 6 मिस कॉल्स? कॉलबॅक केला तर लगेच उचलला फोन त्याने आणि तो परत तेच बोलला कि, मला तुझ्यासोबत दोन माहिन्यात लग्न करायचं.! आता मात्र मला त्याच्या आवाजात गांभीर्य जाणवलं, मी थोडी खोलात जाऊन विचारलं नेमकं काय झालंय? तू असं लग्न करायचं आणि तेही दोन महिन्यात हे , एकदम मना...

माझ्या कल्पनेतील गाव

  माझ्या कल्पनेतील गाव असावं गावसारखं  सकाळी पाखरांचा किलबिलाट ऐकवणार जनावरांच्या गळ्यातील घुंगराच्या रुणझुण आवाजत रमणार सकाळच्या शेण्याच्या सड्याने सारवलेल्या अंगणात संस्कृती जपण्यासाठी काढलेल्या रांगोळीच झुळणाऱ्या पानांचं, फुलणारऱ्या फुलांचं पेलणाऱ्या हातांच दुसऱ्यासाठी हळाळणाऱ्या मनाचं शेजारच्यांच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या माणसांच माणुसकी जपणाऱ्या मनाचं आपुलकीने जवळ घेणाऱ्या हाताच नसावं नुसत्या बातांच आणि पोकळ मनाचं अस समृद्ध गाव असावं माझ.

ती.....

 ती.. घरात एकटं असल्यावर तुझ्यासोबत जगता येत... थोडं हसून झाल्यावर मनसोक्त रडता येत.. आपल्या रोजच्या भेटी तशा नवीनच असायच्या  ... क्षणभर भेटलो तरीही हृदय जाळीत बसायच्या... कधी कधी आपली भेट तेव्हढ्यापुरतीच असायची तेव्हा थोडस रुसूनही तू गोड हसायची.... तुझ्या प्रेमाची विशालता बोलते अबोल गाणी तुझ्या विरहाची वेदना आणते डोळ्यात पाणी....                       नम्रता अनंत कडव