मुख्य सामग्रीवर वगळा

माझ्या कल्पनेतील गाव

 माझ्या कल्पनेतील गाव असावं गावसारखं 

सकाळी पाखरांचा किलबिलाट ऐकवणार
जनावरांच्या गळ्यातील घुंगराच्या
रुणझुण आवाजत रमणार

सकाळच्या शेण्याच्या सड्याने सारवलेल्या अंगणात
संस्कृती जपण्यासाठी काढलेल्या रांगोळीच
झुळणाऱ्या पानांचं, फुलणारऱ्या फुलांचं
पेलणाऱ्या हातांच

दुसऱ्यासाठी हळाळणाऱ्या मनाचं
शेजारच्यांच्या दुःखाने आपल्या डोळ्यात
पाणी आणणाऱ्या माणसांच

माणुसकी जपणाऱ्या मनाचं
आपुलकीने जवळ घेणाऱ्या हाताच
नसावं नुसत्या बातांच आणि पोकळ मनाचं
अस समृद्ध गाव असावं माझ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपुर्ण

                                                          असाही एक दिवस उगवेल असं कधी वाटलंच  नाही, मी माझं माझं करत राहिली अन माझं कधी निसटून गेलं समजलंच नाही...     अचानक मला काल रात्री कॉल आला आणि तो म्हणाला मला कोणत्याही परिस्थितीत मध्ये दोन महिन्याच्या आत लग्न करायचंय.! मला समजेच ना की, हा अचानक असा का बोलतोय..? मला वाटलं नेहमीसरखी आजही प्रेमाने चेष्टा करत असेल. मी दुर्लक्ष करत विषय सोडून दिला.   आज पहिला पेपर असल्याने सकाळी उठून, पटापट आवरून पेपरला गेले, पेपर सुटल्यावर मोबाइल बघितला तर त्याचे 6 मिस कॉल होते , मी घाबरले कि असं काय झाल कि एकदम 6- 6 मिस कॉल्स? कॉलबॅक केला तर लगेच उचलला फोन त्याने आणि तो परत तेच बोलला कि, मला तुझ्यासोबत दोन माहिन्यात लग्न करायचं.! आता मात्र मला त्याच्या आवाजात गांभीर्य जाणवलं, मी थोडी खोलात जाऊन विचारलं नेमकं काय झालंय? तू असं लग्न करायचं आणि तेही दोन महिन्यात हे , एकदम मना...

ती.....

 ती.. घरात एकटं असल्यावर तुझ्यासोबत जगता येत... थोडं हसून झाल्यावर मनसोक्त रडता येत.. आपल्या रोजच्या भेटी तशा नवीनच असायच्या  ... क्षणभर भेटलो तरीही हृदय जाळीत बसायच्या... कधी कधी आपली भेट तेव्हढ्यापुरतीच असायची तेव्हा थोडस रुसूनही तू गोड हसायची.... तुझ्या प्रेमाची विशालता बोलते अबोल गाणी तुझ्या विरहाची वेदना आणते डोळ्यात पाणी....                       नम्रता अनंत कडव

प्रेम

 ही कविता आहे  इतकाच भाव मनात ठेव माझ्यात आता ताकत नाही  कुणाला दुखवायची हे ध्यानात ठेव  समज गैरसमज नको परत काहीच  माझं प्रेम तुझं प्रेम माझ्या भावना तुझं दुःख रुसवे फुगवे नाही आता परवडणारे  खूप घालमेल झाली जीव कासावीस होऊन गेला काय सांगू सख्या तुला माझा जीव माझ्यातच नाही राहिला  परत तुझ्याशी बोलणं नव्याने गोष्ट  सुरू करणे आता नाही जमायचे हे घाव मनावरचे आता नाही परवडायचे  दुखलं असेल तुझही मन कितीदा सावरायचे तुझ्या या वागण्यातले अदलाबदल आता नाही जमायचे  किती सावरू तुला अन मलाही नाही घेणार कुणी समजून प्रेम वेदना तुझ्या आणि माझ्या  आता दोघांनीच जगाशी लढायचे                   नम्रता अनंत कडव