मुख्य सामग्रीवर वगळा

मनात नसतांना....

मनात नसतांना....

  मनात नसतांना कुणाला
कधी कधी दुःखवावे लागते
उत्तर माहीत नसलेल्या प्रश्नांना
कधी कधी सामोरे जावे लागते

  मनात नसतांना कुणाला
  कधी कधी फसवावे लागते
  वाट माहीत नसतांना वाटसरूला
  वाटेने त्या जावेच लागते

फांदीच्या मनात नसतांना  फुलाला डहाळीवरून पडावे लागते
अग्नीच्या मनात नसतांना शवाला
कधी कधी जाळावे लागते

माणसाच्या मनात नसतांना
कधीतरी जगातून जावेच लागते
अन.....
आपल्या मनात नसतांना
आपल्याला आपल्या प्रिय
व्यक्तीला सोडून जावेच लागते.
-नम्रता

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपुर्ण

                                                          असाही एक दिवस उगवेल असं कधी वाटलंच  नाही, मी माझं माझं करत राहिली अन माझं कधी निसटून गेलं समजलंच नाही...     अचानक मला काल रात्री कॉल आला आणि तो म्हणाला मला कोणत्याही परिस्थितीत मध्ये दोन महिन्याच्या आत लग्न करायचंय.! मला समजेच ना की, हा अचानक असा का बोलतोय..? मला वाटलं नेहमीसरखी आजही प्रेमाने चेष्टा करत असेल. मी दुर्लक्ष करत विषय सोडून दिला.   आज पहिला पेपर असल्याने सकाळी उठून, पटापट आवरून पेपरला गेले, पेपर सुटल्यावर मोबाइल बघितला तर त्याचे 6 मिस कॉल होते , मी घाबरले कि असं काय झाल कि एकदम 6- 6 मिस कॉल्स? कॉलबॅक केला तर लगेच उचलला फोन त्याने आणि तो परत तेच बोलला कि, मला तुझ्यासोबत दोन माहिन्यात लग्न करायचं.! आता मात्र मला त्याच्या आवाजात गांभीर्य जाणवलं, मी थोडी खोलात जाऊन विचारलं नेमकं काय झालंय? तू असं लग्न करायचं आणि तेही दोन महिन्यात हे , एकदम मना...

ती.....

 ती.. घरात एकटं असल्यावर तुझ्यासोबत जगता येत... थोडं हसून झाल्यावर मनसोक्त रडता येत.. आपल्या रोजच्या भेटी तशा नवीनच असायच्या  ... क्षणभर भेटलो तरीही हृदय जाळीत बसायच्या... कधी कधी आपली भेट तेव्हढ्यापुरतीच असायची तेव्हा थोडस रुसूनही तू गोड हसायची.... तुझ्या प्रेमाची विशालता बोलते अबोल गाणी तुझ्या विरहाची वेदना आणते डोळ्यात पाणी....                       नम्रता अनंत कडव

प्रेम

 ही कविता आहे  इतकाच भाव मनात ठेव माझ्यात आता ताकत नाही  कुणाला दुखवायची हे ध्यानात ठेव  समज गैरसमज नको परत काहीच  माझं प्रेम तुझं प्रेम माझ्या भावना तुझं दुःख रुसवे फुगवे नाही आता परवडणारे  खूप घालमेल झाली जीव कासावीस होऊन गेला काय सांगू सख्या तुला माझा जीव माझ्यातच नाही राहिला  परत तुझ्याशी बोलणं नव्याने गोष्ट  सुरू करणे आता नाही जमायचे हे घाव मनावरचे आता नाही परवडायचे  दुखलं असेल तुझही मन कितीदा सावरायचे तुझ्या या वागण्यातले अदलाबदल आता नाही जमायचे  किती सावरू तुला अन मलाही नाही घेणार कुणी समजून प्रेम वेदना तुझ्या आणि माझ्या  आता दोघांनीच जगाशी लढायचे                   नम्रता अनंत कडव