असाही एक दिवस उगवेल असं कधी वाटलंच नाही, मी माझं माझं करत राहिली अन माझं कधी निसटून गेलं समजलंच नाही...
अचानक मला काल रात्री कॉल आला आणि तो म्हणाला मला कोणत्याही परिस्थितीत मध्ये दोन महिन्याच्या आत लग्न करायचंय.! मला समजेच ना की, हा अचानक असा का बोलतोय..? मला वाटलं नेहमीसरखी आजही प्रेमाने चेष्टा करत असेल. मी दुर्लक्ष करत विषय सोडून दिला.
आज पहिला पेपर असल्याने सकाळी उठून, पटापट आवरून पेपरला गेले, पेपर सुटल्यावर मोबाइल बघितला तर त्याचे 6 मिस कॉल होते , मी घाबरले कि असं काय झाल कि एकदम 6- 6 मिस कॉल्स?
कॉलबॅक केला तर लगेच उचलला फोन त्याने आणि तो परत तेच बोलला कि, मला तुझ्यासोबत दोन माहिन्यात लग्न करायचं.! आता मात्र मला त्याच्या आवाजात गांभीर्य जाणवलं, मी थोडी खोलात जाऊन विचारलं नेमकं काय झालंय? तू असं लग्न करायचं आणि तेही दोन महिन्यात हे , एकदम मनावर का घेतलय..? तर तो अचानक रडायला लागला. कधीही स्वतः न रडता दुसऱ्यांना राडवणारा हा, आज एकदम हळव्या मनाने रडत होता, इतका की त्याला रडू आवरत च नव्हतं. मी मात्र गूढ मनाने विचार करत बसली के असं काय झालं
मी निशब्द झाले होते, काही समजेच ना की यावर काय प्रतिउत्तर द्यावे... आम्ही तासंतास बोलायचो ग... सर्व एकमेकांना सांगायचो, मनाने मी पूर्णपणे तिचा झालेलो..। पण दिवाळीपासून काय झालं समजलंच नाही, आणि एकेदिवशी सर्व संपवून अचानक सोडून गेली ग ती...
त्याच्या या बोलण्यामध्ये, माझा कुठेचं विचार नव्हता, एरवी मला खूप त्रास व्हायचा या असल्या गोष्टींचा, प्रेमात धोका वगैरे या गोष्टी मी सहन करूच शकत नव्हते, पण आज मात्र असं काहीच वाटलं नाही, म्हणजे मी चिडले देखील नाही... का माहित नाही...
एक ना हजार प्रश्न पडले मला , या सर्वात माझा काय दोष..? यात माझ्या मनाचा कुठे विचार करण्यात आला..? मी केलेली तडजोड कुठे गेली..? मी याला सुखदुःखात दिली साथ तो अचानक कसा विसरला..? मुळात आधीपासून मी असतांना तो गेलाच कसा दुसरीकडे ? याच्या अश्या वागण्यामध्ये माझंच काही चुकलं असेल का..? मी कुठे कमी पडले का..? नेमकी चूक कुणाची?
इतकं हलकं असत का प्रेम..? अशी असते प्रेमाची परिभाषा.? आपण एखाद्यावर निःस्वार्थ पणे प्रेम कराव आणि त्याने मात्र आपल्या प्रेमाचा खेळ करावा, आणि जेव्हा त्याच्यासोबत असा काही घडून येईल तेव्हा त्याने आपल्याजवळ पश्चाताप करत यावं... इतकं स्वस्त असत प्रेम कि कुणावरही व्हावं...?
नम्रता अनंत कडव
मॅडम तुम्ही तुमच्या लेखातून असंख्य तरुण तरुणीच्या जीवनात घडलेल्या घटना चे हुबेहुब वर्णन करून त्यांच्या कोंबलेले भावनाना कोणीतरी लेखनातून स्पष्ट केल्या याची जाणीव होते. नक्कीच या लेखाने असंख्य तरुण - तरुणी दिलासा मिळेल. एकदम अप्रतिम लेखन.
उत्तर द्याहटवाएक छोटा मानस. धन्यवाद सर
हटवाWa,bahut khub,tuzya ya lekhatun,vastav spasht hote ki baryach taruni tyani nivdlelya sathidaravr nisearthi Prem krtat matra to ya nisearthi premala tyala jevha ekhadi addl ghadte tevhach janun gheto.ya lekhatun tu ajchya taruninna savadh krnyasathi khup motha,upyukt salla Dila,apratim ,yogya udaharn bahut badhiya , Khup mast
उत्तर द्याहटवाThank you
हटवाप्रत्येक युवा पिढी नी हा लेख वाचन्यासारखाआहे
उत्तर द्याहटवाप्रत्येकाच्या मनातलं लीहणारा खरा लेखक असतो....🙏
उत्तर द्याहटवाअपूर्ण किती पूर्ण लिहलय...
हटवा