ही कविता आहे
इतकाच भाव मनात ठेव
माझ्यात आता ताकत नाही
कुणाला दुखवायची हे ध्यानात ठेव
समज गैरसमज नको परत काहीच
माझं प्रेम तुझं प्रेम
माझ्या भावना तुझं दुःख
रुसवे फुगवे नाही आता परवडणारे
खूप घालमेल झाली
जीव कासावीस होऊन गेला
काय सांगू सख्या तुला
माझा जीव माझ्यातच नाही राहिला
परत तुझ्याशी बोलणं
नव्याने गोष्ट
सुरू करणे
आता नाही जमायचे
हे घाव मनावरचे आता नाही परवडायचे
दुखलं असेल तुझही मन
कितीदा सावरायचे
तुझ्या या वागण्यातले
अदलाबदल आता नाही जमायचे
किती सावरू तुला अन मलाही
नाही घेणार कुणी समजून
प्रेम वेदना तुझ्या आणि माझ्या
आता दोघांनीच जगाशी लढायचे
नम्रता अनंत कडव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा