मुख्य सामग्रीवर वगळा

प्रेम


 ही कविता आहे 

इतकाच भाव मनात ठेव

माझ्यात आता ताकत नाही 

कुणाला दुखवायची हे ध्यानात ठेव 


समज गैरसमज नको परत काहीच 

माझं प्रेम तुझं प्रेम

माझ्या भावना तुझं दुःख

रुसवे फुगवे नाही आता परवडणारे 


खूप घालमेल झाली

जीव कासावीस होऊन गेला

काय सांगू सख्या तुला

माझा जीव माझ्यातच नाही राहिला 


परत तुझ्याशी बोलणं

नव्याने गोष्ट 

सुरू करणे

आता नाही जमायचे

हे घाव मनावरचे आता नाही परवडायचे 


दुखलं असेल तुझही मन

कितीदा सावरायचे

तुझ्या या वागण्यातले

अदलाबदल आता नाही जमायचे 


किती सावरू तुला अन मलाही

नाही घेणार कुणी समजून

प्रेम वेदना तुझ्या आणि माझ्या 

आता दोघांनीच जगाशी लढायचे


                  नम्रता अनंत कडव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

ती.....

 ती.. घरात एकटं असल्यावर तुझ्यासोबत जगता येत... थोडं हसून झाल्यावर मनसोक्त रडता येत.. आपल्या रोजच्या भेटी तशा नवीनच असायच्या  ... क्षणभर भेटलो तरीही हृदय जाळीत बसायच्या... कधी कधी आपली भेट तेव्हढ्यापुरतीच असायची तेव्हा थोडस रुसूनही तू गोड हसायची.... तुझ्या प्रेमाची विशालता बोलते अबोल गाणी तुझ्या विरहाची वेदना आणते डोळ्यात पाणी....                       नम्रता अनंत कडव